प्राचिन भारतीय संस्कृतीचा अमुल्य ठेवा म्हणजे आपले वैदिक वाड्मय. याच ज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य आपल्या वैदिक ज्ञान-विज्ञान संस्कृत महाविद्यालयामार्फत गेल्या १८ वर्षापासून अव्याहतपणे सुरु आहे.
वैदिक सम्राट कै.पं.श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी यांच्या प्रेरणेने तसेच दानशूर दाते श्री.शशी जाधव यांनी गुरुकुलास दिलेल्या जागेमुळे या निवासी गुरुकुलामध्ये वेद अध्ययन चालते. इ.स.१९९९ मध्ये गुढीपाडवा या शुभदिनी उभारलेली वेद अध्यापनाची गुढी आजपर्यंत प्राचार्य स्मार्तचुडामणी शांतारामशास्त्री भानोसे व उपप्राचार्य घनपाठी दिनेशशस्त्री गायधनी यांच्या योगदानाने डौलाने उभी आहे.
५ विद्यार्थ्यांना घेऊन सुरुवात केलेल्या या गुरुकुलाचा विस्तार आज ४० विद्यार्थ्यांपर्यंत झालेला आहे. त्यांची निवास व्यवस्था,भोजन व्यवस्था,संपुर्णतः गुरुकुलामार्फत केली जाते.